मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोविड१९ च्या १२१ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ८२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात आतापर्यंत ७८ लाख ७९ हजार ३९९ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी ७७ लाख ३० हजार २०९ रुग्ण बरे झाले, तर १ लाख ४७ हजार ८४७ रुग्ण दगावले. सध्या राज्यात १ हजार ३४३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईत काल ६३ नवे रुग्ण आढळले. त्यापैकी ६१ रुग्णांमधे लक्षणं नाहीत. २ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं. आज ५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. मुंबईत सध्या ८२२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईतला कोरोना मुक्तीचा दर ९८ टक्के असून, रुग्णदुपटीचा कालावधी ६ हजार ३४७ दिवसांवर आला आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.