ओबीसी आरक्षणप्रश्नी प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना हस्तक्षेपाची विनंती करणार, कपिल पाटील यांचं आश्वासन

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओबीसी आरक्षणाचा विषय प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांपर्यंत पोचवून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचं केंद्रीय पंचायती राज मंत्री कपिल पाटील यांनी सांगितलं. ते काल पालघर इथं ओबीसी हक्क संघर्ष समितीनं काढलेल्या ओबीसी आक्रोश मोर्चात बोलत होते. ओबीसीची जातीनिहाय जनगणना व्हावी आणि ओबीसीना आरक्षण मिळावं यासाठी हा मोर्चा असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या 4 तारखेला राज्य सरकारनं सादर केलेला डेटा सुप्रीम कोर्टानं स्विकारला तर ओबीसींच आरक्षण नक्की आपल्याला मिळेल असं ते म्हणाले. ज्या समाजाला हे आरक्षण देणार आहात तो समाज अतिशय मागासलेला आहे हे सुप्रीम कोर्टाला पटवून द्यावं लागेल असं पाटील यांनी सांगितलं. 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image