ओबीसी आरक्षणप्रश्नी प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना हस्तक्षेपाची विनंती करणार, कपिल पाटील यांचं आश्वासन
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओबीसी आरक्षणाचा विषय प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांपर्यंत पोचवून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचं केंद्रीय पंचायती राज मंत्री कपिल पाटील यांनी सांगितलं. ते काल पालघर इथं ओबीसी हक्क संघर्ष समितीनं काढलेल्या ओबीसी आक्रोश मोर्चात बोलत होते. ओबीसीची जातीनिहाय जनगणना व्हावी आणि ओबीसीना आरक्षण मिळावं यासाठी हा मोर्चा असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या 4 तारखेला राज्य सरकारनं सादर केलेला डेटा सुप्रीम कोर्टानं स्विकारला तर ओबीसींच आरक्षण नक्की आपल्याला मिळेल असं ते म्हणाले. ज्या समाजाला हे आरक्षण देणार आहात तो समाज अतिशय मागासलेला आहे हे सुप्रीम कोर्टाला पटवून द्यावं लागेल असं पाटील यांनी सांगितलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.