राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणण्याचे प्रयत्न हाणून पाडण्याची दिलीप वळसे-पाटील यांची ग्वाही

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे, मात्र हे आम्ही कदापिही होऊ देणार नाही, अशी ग्वाही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्यांवर पोलीसांनी केलेली कारवाई कायद्यानुसार असून कोठडीत नवनीत राणा यांना कोणतीही हीन दर्जाची वागणूक दिली गेलेली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या १ मे रोजी होणाऱ्या औरंगाबादमधल्या नियोजित सभेसंदर्भात येत्या २ दिवसात औरंगाबादचे पोलीस आयुक्त, परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पोलीस महासंचालकांशी चर्चा करून निर्णय घेतील असंही त्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीला अस्थिर करण्यासाठी विरोधी पक्षाकडून प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही गृहमंत्र्यांनी केला. 

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image