स्थानिक गरजा आणि उपलब्धता लक्षात घेऊन योजना आखल्या, तर शाश्वत विकास शक्य - प्रधानमंत्री
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थानिक गरजा आणि उपलब्धता लक्षात घेऊन योजना आखल्या, तर शाश्वत विकास शक्य आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आसाममध्ये दिफू इथं शांती एकता आणि विकास मेळाव्यात बोलत होते.
स्थानिक गरजांवर सरकारचा भर आहे, असं त्यांनी सांगितलं. आसाममध्ये यापुढं अराजक आणि विद्वेश दिसणार नाही, आसामच्या मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न राज्यात शांती कायम राखतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दिफू इथं पशु वैद्यकीय महाविद्यालय आणि कोलोंगा इथं कृषी महाविद्यालयासह ५०० कोटी रुपयापेक्षा जास्त खर्चाच्या विविध शैक्षणिक प्रकल्पांची पायभरणी प्रधानमंत्र्यांनी केली.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.