मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमधे उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमधे उष्णतेची तीव्र आणि दीर्घ लाट येण्याचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिला आहे. या परिसरात कालपासूनच तापमानात वाढ होऊ लागली ती आजही कायम राहील असा अंदाज आहे. गेले काही दिवस तापमान ३९ अंश सेल्सियसच्या आसपास असून सरासरी तापमानापेक्षा ते ६ अंशांनी जास्त आहे. या काळात दुपारी १२ ते ३ या वेळात उन्हात जाणं टाळावं तसंच शरीराचं तापमान आटोक्यात ठेवण्याच्या दृष्टीनं पुरेशा प्रमाणात पाणी आणि द्रवरुप पदार्थांचं सेवन करावं असा सल्ला हवामान विभागानं दिला आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image