युक्रेनच्या सुमी भागात अडकलेल्या भारतीयांनी बाहेर पडण्यासाठी तयार रहावं - भारतीय दूतावास

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनच्या सुमी भागात अडकलेल्या भारतीयांनी बाहेर पडण्यासाठी तयार रहावं, असं भारतीय दूतावासाने सांगितलं आहे. त्यांना सुरक्षितपणे युक्रेनबाहेर जाता यावं याकरता दूतावासाचे अधिकारी पोल्तावा इथं तैनात असून बाहेर पडण्याची निश्चित तारीख आणि वेळ लौकरच कळवू तोपर्यंत दूतावासाने जारी केलेले गुगल अर्ज भरुन द्यावे असं आवाहन करण्यात आलं आहे. भारतीयांना सुखरुप परत आणण्यात दूतावास कोणतीही कसर ठेवणार नाही असं भारतीय राजदूत पार्थ सत्पती यांनी सांगितलं आहे.

ऑपरेशन गंगा अंतर्गत बाराशेहून जास्त भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणणारी 7 विमानं आज बुडापेस्ट, सुशेवा आणि बुखारेस्ट विमानतळांवरुन आकाशात झेपावतील अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी दिली. काल 11 विमानांमधून दोनहजारपेक्षा जास्त भारतीय मायदेशी परतले. 22 फेब्रुवारीला ऑपरेशन गंगा सुरु झाल्यापासून 15 हजारापेक्षा जास्त भारतीय नागरिक युक्रेनमधून सुरक्षितपणे भारतात परत आले आहेत.

ऑपरेशन गंगाच्या सफलतेचं श्रेय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या वाढत्या प्रभावाला दिलं आहे. पुण्यात काल सिम्बायोसिस विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवात केलेल्या भाषणात ते म्हणाले की युद्धग्रस्त युक्रेनमधून नागरिकांना सुखरुप बाहेर काढताना भल्या भल्या देशांना अडचणी येत आहेत.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image