पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटिव्ही बसवण्याच्या सद्यस्थिती बाबत लवकर अहवाल सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्याच्या सद्यस्थिती बाबत लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. या संदर्भात सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयानं सुचना देउनही पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नाहीत.

राज्यात एकूण १ हजार ८९ पोलीस ठाणी असून आतापर्यंत ६ हजार ९२ कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यातले ४५३ कॅमेरे नादुरुस्त झाले आहेत. बऱ्याच प्रकरणात न्यायलयानं सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज मागवले होते, पण पोलिसांनी ते सादर करायला  असमर्थता दर्शवली होती, म्हणून न्यायालयानं हे निर्देश दिले आहेत.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image