वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी-२० मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ विजयी
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात टी-२० क्रिकेट मालिकेतला पहिला सामना काल भारतानं ६ गडी राखून जिंकला. कोलकता इथं झालेल्या सामन्यात भारताना नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडीजनं भारतासमोर विजयासाठी १५८ धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रतिउत्तरादाखल भारतानं १८ षटकं आणि ४ चेंडूत १६२ धावा केल्या. रोहित शर्मानं १९ चेंडूत ४० धावा केल्या तर, इशान किशननं ३५ धावा केल्या.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.