परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा पाचवा भाग फेब्रुवारी महिन्यात होणार असून त्यासाठी नावनोंदणी करण्याचा आज शेवटचा दिवस
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा पाचवा भाग फेब्रुवारी महिन्यात होणार असून त्यासाठी नावनोंदणी करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या स्पर्धेत इयत्ता नववी ते बारावीचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक भाग घेऊ शकतात. या कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांची निवड करण्याकरता एक ऑनलाइन लेखन स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून उमेदवार संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध असलेले आपल्या आवडीचे विषय त्यासाठी निवडू शकतात. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाची संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची असून त्याद्वारे ते देश-विदेशातले विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधतात.परीक्षांमुळे उद्भवणाऱ्या ताण तणावावर मात करून सहजपणे अभ्यास कसा करता येईल, यावर या कार्यक्रमात चर्चा केली जाते.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.