रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान

 

मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यात अलिबाग, महाड, माणगाव, रोहा, उरण, पाली, पेण, पनवेल या तालुक्यांमधे काल संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसाने भाजीपाला, कडधान्य, पांढरा कांदा, आंबा या पिकांचं चांगलंच नुकसान झालं आहे.अचानक आलेल्या पावसानं शेतकऱ्यांबरोबरच बाजारपेठांमधे व्यापाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. वीट व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कलिंगड आंबा, काजू पिकांचे ही नुकसान झाले आहे. रब्बी पिकांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यात काल दुपारपासून मुसळधार पाऊस आणि गारांनी जनजीवन विस्कळीत केलं आहे.राज्यात कोविड रुग्णांची संख्या वाढत असली तरी चिखलदऱ्याला पर्यटकांचा ओघ सुरुच आहे. मात्र सध्या चिखलदऱ्याच्या सौंदर्यावर धुक्याची चादर निर्माण झाली आहे. मेळघाटातल्या कोलकास सेमाडोह हरिसाल चिखलदरा मोथासह संपूर्ण मेळघाटावर सध्या चं आच्छादन आहे यामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालं असलं तरी पर्यटक मात्र या वातावरणाचा आनंद घेत असल्या३चं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.सातारा शहर आणि परिसरात आज सकाळी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला असून, वातावरण सध्या ढगाळ आहे.

 

 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image