प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या अंतर्गत सुरक्षाविषयक परिस्थितीत सुधारणा झाली - निसिथ प्रमाणिक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची अंतर्गत सुरक्षाविषयक परिस्थितीत सुधारणा झाली असं केंद्रीय गृह राज्यमंत्री निसिथ प्रमाणिक यांनी म्हटलं आहे. निसिथ प्रामाणिक यांनी आज नवी दिल्लीत, सशस्त्र सीमा बलाच्या ५८व्या स्थापना दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केलं. देशविरोधात कारवाया करणाऱ्या कोणत्याही शक्तींचे मनसुबे सशस्त्र सीमा बल हाणून पाडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जम्मू-काश्मीरमधली बंडखोरी, तसंच इतर राज्यांमधल्या नक्षलवादी कारवायांचा सशस्त्र सीमा बल यशस्वीपणे सामना करत आहे अशा शब्दांत त्यांनी सशस्त्र सीमा बलाच्या कार्याचं कौतुकही केलं.

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image