संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सुरक्षा जवानांना देशाचं अभिवादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज २० वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त, या हल्ल्यापासून संसदेचं रक्षण करताना शहीद झालेल्या सुरक्षा जवानांना आज संपूर्ण देश अभिवादन करत आहे. संसद भवनात आज झालेल्या आदरांजली कार्यक्रमात उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि इतर सदस्यांनी या सुरक्षा जवानांना अभिवादन केलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरवर या सुरक्षा जवानांना आदरांजली वाहिली आहे. त्यांनी केलेल्या सर्वोच्च बलिदानासाठी देश या जवानांचा सदैव ऋणी राहील, असं त्यांनी म्हटलं आहे. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनीही अशीच भावना व्यक्त केली आहे. मानवता आणि जागतिक शांततेला दहशतवादाचा धोका आहे. त्यामुळे दहशतवादाला पराभूत करण्यासाठी सर्व देशांनी एकजूट राहीलं पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे. तर, या जवानांनी केलेली देशाची सेवा आणि त्यांचा त्याग प्रत्येक नागरिकाला नेहमी प्रेरणा देत राहील, अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे.
Popular posts
भारताला रशियाकडून एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यावर निर्बंध न लादण्याचा अमेरिकेचा निर्णय
• महेश आनंदा लोंढे
![Image](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhlzvgfulK3OKy9V2-1zOpVNYU6HUy5QREto1i9t3o9GQjrZlvhC3tRaGrb53ZEguQXiWzEgf5S5RvbiNBfjt_Opp-I5qRHeKobyGVuISzB6gdPMn4RDXiiypZr-MT8aDf-_magoqB-Kr5FtCtCQXw17jqGBy1egCcTwmhLp3W8CmZCv8QOdy040tll/w640-h402/NPIC-2022716145630.jpg)
• महेश आनंदा लोंढे
![Image](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiuDwJiBqg2H-QKeaLirt4Rk6VF9Fc-oLJ0STr7wQmGfM2AaX47vREnRFWPj6ohf52ze_dP6SaONW5G_eJ6-tmr5AAVppqixF_HsLotDOCy1wgn0eTcQ75U4fPr8RWEt1BBKH6bfX_EXCWU0bN-Aa__40OYfm4dnHXr-Os5UkDndhpx52L7rh6Mgcj1/w336-h640/major-dhyan-chand-pm-modi-6-8-21-2.jpg)
लाल समुद्र आणि एडनच्या आखातातल्या जहाजांवरचे हल्ले थांबवण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं हौती दहशतवाद्यांना आवाहन
• महेश आनंदा लोंढे
![Image](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjvBvaw3-YQzi2BCsFs1acnPTw-Fmmu4tVyJ6LgxyzkdSFnTRE8_E9SucWRFBkZDKPPLp3Su2AH2lTggEuBc1EMkqI8r9qmJbvEPpwfJNxMbv3m41rI6S0CLjcYzOZT0zL74RbeWCQXiY9uiwP_ssp-qx-QYW2INYgJDHLYq2E55h1Oz1XvqDx-XgiTTM0/w640-h402/6.jpg)
न्यायव्यवस्था गतिमान करत, सर्वसामान्यांना विनाविलंब न्याय मिळावा या बाबी सरकारच्या प्राधान्यक्रमावर - किरेन रिजिजू
• महेश आनंदा लोंढे
![Image](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEghkr0D7RxYSxFm78Tb87RX3XGstdViXiwrsqYTlTM3lgHOJ5zUm5qyAgz1EQuk8X_6C32OVkRfSmEZMzDKE8qKHwjhrCMPcw4dks0HhOkz--ZY_Sf9FnHzN_VzDunjhhvv1-ksZDTZtpZP73H75TCv2JwI4E3-bDFaLHkq1jWJtZmUEAx_NNZbNcsw/w640-h402/NPIC-202271015442.jpg)
भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना कोविन पोर्टलवर नोंदणी करून लस घेण्यास परवानगी
• महेश आनंदा लोंढे
Publisher Information
Contact
ekachdheya17@gmail.com
9860638161
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.
Share this page
Email
Message
Facebook
Whatsapp
Twitter
LinkedIn