कोकणाचा विकास करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील - उपमुख्यमंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोकणाचा विकास करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल रायगड जिल्ह्यात दिवेआगार इथल्या सुवर्ण गणेश मंदिरातल्या सुवर्ण गणेश मुखवटा प्रतिष्ठापना सोहळ्यात बोलत होते. महाराष्ट्राच्या दृष्टीनं कोकण आणि कोकणवासियांचा विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यादृष्टीनं विविध योजनांच्या माध्यमातून कोकणचा विकास साध्य करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. राष्ट्रीय गोवा महामार्गाचं रखडलेलं काम पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. रायगडची भौगोलिक रचना लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक कायमस्वरूपी स्थापित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं. दिवेआगार ग्रामपंचायत आणि ग्रामसचिवालय कार्यालयासाठी एक कोटी रुपये निधीची घोषणा त्यांनी केली. एसटी कामगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन सातत्यानं प्रयत्न करीत आहे, असं अजित पवार म्हणाले.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image