कार्तिकी यात्रा आयोजित करण्यासंदर्भात विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीकडून प्रशासनाला प्रस्ताव सादर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कार्तिकी यात्रा व्हावी अशी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची इच्छा असून, शासन निर्णयाच्या अधीन राहून वारी व्हावी, याकरता जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. कार्तिकी यात्रा भरवण्यासंदर्भात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कार्तिकी वारीतला एकादशीचा मुख्य सोहळा १५ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. भाविकांनी श्री विठ्ठल- रुक्मिरणी मंदिरात 1985 पासून अर्पण केलेल्या सुमारे 27 किलो वजनाच्या सोन्याच्या वस्तू, छोटे दागिने वितळवून त्यातून नवीन अलंकार घडवण्यासाठी शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे  परवानगी मागितली जाणार आहे अशी माहितीही औसेकर महाराज यांनी दिली.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image