महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ६८ शतांश टक्के

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात काल कोविड १९ चे ९७४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. ८४८ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ५० रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ६६ लाख ३३ हजार १०५ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ६४ लाख ७९ हजार ३९६ रुग्ण बरे झाले. तर १ लाख ४० हजार ८५७ रुग्ण दगावले. सध्या राज्यात ९ हजार १८७ एक्टीव्ह रुग्ण आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ६८ शतांश टक्के झालं आहे. तर मृत्यूदर २ पूर्णांक १२ शतांश टक्के आहे.