भारतमाला योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात सुमारे ६५ हजार किलोमीटरहून अधिक लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती पूर्ण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतमाला योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात सुमारे ६५ हजार किलोमीटरहून अधिक लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती पूर्ण झाल्याची माहिती परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते काल भविष्यासाठी भारताचे सशक्तीकरण या विषयावर आयोजित चर्चासत्रात दूरदृश्य प्रणाली मार्फत बोलत होते. २०२५ पर्यंत २ लाख किलोमीटर लांबीचे महामार्ग निर्माण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं. हरित महामार्ग योजनेअंतर्गत स्थानिक लोकांच्या सहभागातून महामार्गांलगत वृक्षारोपण केलं जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.

 

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image