राज्यात उद्यापासून १४ ऑक्टोंबरपर्यंत 'मिशन कवचकुंडल' राबवण्यात येणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात येत्या ६ दिवसात ९० लाख जणांचं लसीकरण करण्याच्या उद्देशानं मिशन कवच कुंडल या विशेष लसीकरण मोहीमेची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज केली. उद्यापासून १४ ऑक्टोंबर दरम्यान चालणाऱ्या या सत्रात दररोज १५ लाख जणांना लसीच्या मात्रा देण्यात येणार आहेत. लसीची पहिली मात्रा घेणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं. या विशेष मोहीमेसाठी लस देण्यासाठी आवश्यक असलेल्या सिरिंजसह मनुष्यबळ उपलब्ध करून देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image