नवभारताच्या निर्मितीसाठी सर्वधर्मियांनी मन आणि बुद्धीनं एकत्र येणं आवश्यक - इकबालसिंह लालपुरा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवभारताच्या निर्मितीसाठी सर्वधर्मियांनी मन आणि बुद्धीनं एकत्र येणं आवश्यक आहे, असं मत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबालसिंह लालपुरा यांनी व्यक्त केलं आहे.ते आज मुबंईत विविध धर्मियांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत बोलत होते. समान न्याय, शिक्षण आणि रोजगार या त्रिसूत्रीतूनच विकास साधला जाऊ शकतो, असं ते म्हणाले.सर्वधर्मिय अल्पसंख्याक नेत्यांनी आणि धर्मगुरूंनी अल्पसंख्याकांसाठीच्या विविध सरकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत. धर्माचा वापर राजकारण करण्यासाठी न होता तो समाजातल्या गरजू व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व्हावा,असं आवाहन त्यांनी केलं.

Popular posts
कोल्हापुरातल्या गावित भगिनींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊद टोळीतल्या दोघांना अटक
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image