देशात कोळशाचा पुरेसा साठा उपलब्ध, कुठल्याही अफवांवर जनतेनं विश्वास ठेवू नये - प्रल्हाद जोशी
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोळशाचा पुरेसा साठा उपलब्ध असून वीज पुरवठा खंडित होण्याची कुठलीही शक्यता नसल्याचं कोळसा मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. कोल इंडियाकडे पुढील २४ दिवसांची मागणी पूर्ण करता येईल इतका कोळसा शिल्लक आहे. त्यामुळे वीज पुरवठ्याबाबतच्या कुठल्याही अफवांवर जनतेनं विश्वास ठेवू नये असं आवाहन केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलं आहे. देशातल्या औष्णिक ऊर्जा केंद्रांना दर दिवशी होणारा कोळशाचा पुरवठा वाढवला जात असून मान्सूनचा परतीचा प्रवास संपल्यावर तो आणखी वाढेल असं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. देशातल्या औष्णिक ऊर्जा केंद्रांकडे अंदाजे ७२ लाख टन कोळसा शिल्लक असून तो पुढील ४ दिवस पुरेल. तसंच कोल इंडिया कडे ४०० लाख टन पेक्षा जास्त कोळसा असून औष्णिक ऊर्जा केंद्रांना तो पुरवला जाईल असं कोळसा मंत्रालयानं म्हटलं आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.