कृषी योजनांचा प्रसार करून सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्या - डॉ. विश्वजित कदम

 

मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा पडू नये, खत आणि बियाणे विक्री केंद्रावर गैरव्यवहार होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिल्या. सोलापूरमध्ये आढावा बैठकीत ते बोलत होते. सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ, त्याचप्रमाणे मराठी भाषा या विभागांचा आढावा यावेळी घेण्यात आला. कृषी योजनांचा प्रसार करून सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्या. जिल्ह्यातल्या शिवभोजन थाळी केंद्रांची तपासणी करावी, प्रलंबित जातपडताळणीची प्रकरणं निकाली काढावी अशा सूचनाही डॉ. कदम यांनी दिल्या.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image