मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यसभा सदस्यांच्या मृत्यू किंवा राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या ६ जागांसाठी भारतीय निवडणूक आयोगानं निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यात महाराष्ट्रातले राज्यसभा सदस्य राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेचा समावेश आहे. याशिवाय पश्चिम बंगाल, आसाम आणि मध्यप्रदेशातल्या प्रत्येकी एका, तर तमीळनाडूतल्या दोन जागांसाठीही निवडणूका होतील.
या निवडणुकांसाठी येत्या १५ सप्टेंबरला अधिसूचना जारी होईल. २२ सप्टेंबर ही निवडणुकीसाठी अर्ज दाखल करायची शेवटची तारीख असेल, तर २७ सप्टेंबरपर्यंत अर्ज माग घेता येणार आहेत. यानंतर ४ ऑक्टोबरला, सकाळी ९ ते ४ या वेळेत प्रत्यक्ष निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
निवडणुकीची सगळी प्रक्रिया ६ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पूर्ण केली जाईल असं, निवडणूक आयोगाच्या निवेदनात म्हटलं आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.