राज्यात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक १८ शतांश टक्क्यांवर
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक १८ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल राज्यभरात ३ हजार ८३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या ६५ लाख २४ हजार ४९८ रुग्णांपैकी, ६३ लाख ४० हजार ७२३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात काल २ हजार ५८३ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर २८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाबळींची एकूण संख्या १ लाख ३८ हजार ५४६ वर पोचली आहे. राज्यातला मृत्यूदर २ पूर्णांक १२ शतांश टक्के आहे. सध्या राज्यात ४१ हजार ६७२ ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबईत काल ४४७ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी पाठवण्यात आलं. मुंबईत आतापर्यंत ७ लाख १५ हजार ३९४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ४१९ नवीन रुग्णांची नोंद झाली. मुंबईत आतापर्यंत रुग्णांची संख्या ७ लाख ३८ हजार ५२४ झाली असून, मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी १ हजार १९४ दिवसांवर आलाय. सध्या ४ हजार ५९५ रुग्ण उपचार घेत आहेत. काल कोरोनामुळे ५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांचा एकूण आकडा १६ हजार ५८ वर पोचला आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.