राज्यात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक १८ शतांश टक्क्यांवर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक १८ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल राज्यभरात ३ हजार ८३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या ६५ लाख २४ हजार ४९८ रुग्णांपैकी, ६३ लाख ४० हजार ७२३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात काल २ हजार ५८३ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर २८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाबळींची एकूण संख्या १ लाख ३८ हजार ५४६ वर पोचली आहे. राज्यातला मृत्यूदर २ पूर्णांक १२ शतांश टक्के आहे. सध्या राज्यात ४१ हजार ६७२ ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबईत काल ४४७ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी पाठवण्यात आलं. मुंबईत आतापर्यंत ७ लाख १५ हजार ३९४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ४१९ नवीन रुग्णांची नोंद झाली. मुंबईत आतापर्यंत रुग्णांची संख्या ७ लाख ३८ हजार ५२४ झाली असून, मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी १ हजार १९४ दिवसांवर आलाय. सध्या ४ हजार ५९५ रुग्ण उपचार घेत आहेत. काल कोरोनामुळे ५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांचा एकूण आकडा १६ हजार ५८ वर पोचला आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image