संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेचं ऑगस्ट महिन्यासाठीचं अध्यक्षपद भारताकडे
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १५ सदस्यांच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं अध्यक्षपद भारत स्वीकारणार आहे. या महिन्यात सागरी सुरक्षा, शांतता,आणि दहशतवाद प्रतिबंध अशा तीन विषयांवर कार्यक्रम आयोजित करण्याच्या तयारीत आहे.
यानिमित्त आंतरराष्ट्रीय समुदायाला दिलेल्या संदेशात, संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी, राजदूत तिरुमूर्ती यांनी भारतावरील जबाबदारीचे महत्त्व आणि जागतिक पटलावर आणण्यासाठी भारत काय प्रयत्न करेल यावर काल प्रकाश टाकला. ऑगस्ट महिन्यासाठी हे अध्यक्षपद भारताकडे असणार आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.