संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेचं ऑगस्ट महिन्यासाठीचं अध्यक्षपद भारताकडे

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १५ सदस्यांच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं अध्यक्षपद भारत स्वीकारणार आहे. या महिन्यात सागरी सुरक्षा, शांतता,आणि दहशतवाद प्रतिबंध अशा तीन विषयांवर कार्यक्रम आयोजित करण्याच्या तयारीत आहे.

यानिमित्त आंतरराष्ट्रीय समुदायाला दिलेल्या संदेशात, संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी, राजदूत तिरुमूर्ती यांनी भारतावरील जबाबदारीचे महत्त्व आणि जागतिक पटलावर आणण्यासाठी भारत काय प्रयत्न करेल यावर काल प्रकाश टाकला. ऑगस्ट महिन्यासाठी हे अध्यक्षपद भारताकडे असणार आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image