प्रधानमंत्र्यांची आज ईशान्येकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी कोविडस्थितीबाबत चर्चा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज ईशान्य भारतातल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर संवाद साधणार आहेत. दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून सकाळी 11 वाजता होणाऱ्या या बैठकीत आसाम, नागलँड, त्रिपुरा, सिक्कीम, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम या राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होतील. या राज्यांमधल्या कोरोना परिस्थितीचा मोदी आढावा घेणार आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृह सचिवांनीही ईशान्य भारतातल्या राज्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत, या राज्यांमध्ये कोरोना संसर्ग वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image