स्वामी विवेकानंदांच्या स्मृतीदिना निमित्त राष्ट्रपतींचं अभिवादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज स्वामी विवेकानंद यांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी स्वामी विवेकानंद हे देशातले एक सर्वोच्च अध्यात्मिक नेते, राष्ट्रभक्त, विचारवंत आणि प्रभावी वक्ते होते, असं मत व्यक्त केलं. विवेकानंदांनी विश्वबंधुत्व आणि विश्वशांतीचा सातत्यानं पुरस्कार केला. या शब्दात त्यांच्या विषयीच्या भावना व्यक्त केल्या. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही स्वामी विवेकानंदांच्या कार्याच्या गौरव करुन, स्वामीजींनी समता, आणि शांतीचा संदेश जगाला देऊन प्रत्येकाच्या जीवनाला प्रेरित केलं, असं ट्विटर संदेशात म्हटलं आहे.