भूजल संपत्तीचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : भूजल संपत्ती ही अतिशय महत्त्वाची असून या संपत्तीचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी लोकसहभाग अतिशय महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत केले. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचा सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम काल झाला. त्यावेळी ते बोलत होते. नदीनाल्यांमध्ये होणारे पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. जलपुनर्भरण, पाणी गुणवत्ता या विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कार्यक्रमांत दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होतांना केल्या.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image