कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात कालपासून जोरदार पाऊस

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात कालपासून सोसाट्याचा वारा, आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होत आहे. ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती उद्भवली असून राजधानी मुंबईला जोडणाऱ्या रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला त्याचा फटका बसला आहे. मुंबईत शनिवारपासून मुक्कामाला आलेल्या पावसाचा जोर आता कमी झाला असला तरी आगामी दोन दिवसांकरता दक्षतेचा इशारा वेधशाळेने दिला आहे. शहरात काल सरासरी १०० मिलीमीटर पाऊस झाला, कुठेही पाणी साचलेले नाही. रेल्वे उपनगरी वाहतूक काही स्थानकांपर्यंत सुरळीत आहे. मात्र शेजारी जिल्ह्यांमधे अनेक ठिकाणी पावसानं काल २०० मिलीमीटरची उंची गाठली. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आले असून रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पश्चिम रेल्वेवर वाहतूक सुरळीत आहे. मात्र मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. टिटवाळा ते कसारा आणि अंबरनाथ ते लोणावळा स्थानकांदरम्यान काही ठिकाणी रूळ वाहून गेल्याने किंवा रुळांवर मोठमोठे दगड, मोठ्या प्रमाणात चिखल आल्याने रेल्वे वाहतूक बंद ठेवली आहे. रुळांवरचा राडारोडा हटवण्याचे काम सुरु आहे. असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं. ३२ गाड्यांचा प्रवास मधल्या स्थानकांवर खंडित करण्यात आला, १९ गाड्या इतर मार्गांवर वळवण्यात आल्या तर २५ गाड्या आज रद्द करण्यात आल्या. पर्यायी बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली. कोकण रेल्वेच्या ९ गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
एम. व्ही. मंगलम या कार्गो जहाजावरच्या १६ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image