पंढरपुरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारी काळात १७ ते २५ जुलै दरम्यान संचारबंदी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : पंढरपुरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारी काळात १७ ते २५ जुलै दरम्यान संचारबंदी लागू करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत.

चंद्रभागा परिसरात कलम १४४ लागू करण्यात येणार असून सोलापूर जिल्ह्यातही या काळात त्रिस्तरीय नाकाबंदी करण्यात येणार आहे. यामुळे परवानगी नसलेल्या भाविकाला या काळात जिल्ह्यात प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे यंदाही भाविकांना आषाढी एकादशीला विठ्ठलाचं थेट दर्शन घेता येणार नाही.

तर शासकीय महापूजा, विठ्ठलाशी संतांच्या भेटी गेल्यावर्षीप्रमाणेच करण्यात येणार असून नित्योपचार परंपरेनुसार सुरु ठेवण्यात येणार आहेत. संतांच्या पादुका भेटीदरम्यान मानाच्या पालखी सोहळ्यातील ४० वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. तर वारीसाठीच्या २ बसमध्ये प्रत्येकी २० असे ४० वारकऱ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे.

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image