देशात ७८ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ च्या सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९६ पूर्णांक ३६ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल देशभरात ७८ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले. ५३ हजार २५६ नवे रुग्ण आढळले, तर १ हजार ४२२ रुग्णांचा मृत्यू झाला. देशात २ कोटी ८८ लाख ४४ हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले. तर कोरोनाबळींची एकूण संख्या ३ लाख ८८ हजाराच्या वर गेली आहे. सध्या देशभरात ७ लाख २ हजार ८८७ रुग्ण उपाचाराधीन आहेत.