इंधनदरवाढीमुळे सर्वसामान्य माणसांवरचा बोजा वाढत असल्याची सोनिया गांधींची टीका

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंधनदरवाढीमुळे सर्वसामान्य माणसांवरचा बोजा वाढत असल्याची टीका काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आज त्या बोलत होत्या.

डाळी आणि खाद्यतेलासारख्या जीवनावश्यक वस्तूंचे भावही गगनाला भिडले असून रोजगार हरपला असल्यानं सर्वत्र निराशेचं वातावरण आहे, असं त्या म्हणाल्या. इतर लाखो कुटुंबांप्रमाणे शेतकऱ्यांनाही महागाईचा फटका बसत असल्याचं त्यांनी सांगतलं.