वित्तीय संस्थांचा पतपुरवठा तळागाळातल्या जनतेपर्यंत पोचला पाहिजे - शक्तिकांत दास
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँकांखेरीजच्या वित्तपुरवठा कंपन्यांनी आणि सूक्ष्म वित्तपुरवठा संस्थांनी उचित व्यवहार आचारसंहितेचं काटेकोर पालन करावं, ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा सुधारावी, आणि माहिती तंत्रज्ञानविषयक साधनं मजबूत करावी असा सल्ला रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिला आहे. या वित्तीयसंस्थांच्या प्रमुखांबरोबर ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ने बोलत होते.
पतपुरवठा तळागाळातल्या जनतेपर्यंत पोचला पाहिजे असं सांगून ते म्हणाले की व्यवसायात तग धरुन राहण्यासाठी जोखिमीचं व्यवस्थापन चतुराईने केलं पाहिजे.
सध्याच्या आर्थिक स्थितीत वित्तपुरवठा आणि रोखीची उपलब्धता या विषयांवरही यावेळी चर्चा झाली. रिझर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर्स M. K. जैन, डॉ. M.D. पात्रा आणि इतर वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.