दहावीच्या परीक्षा याचिके बाबत १९ मे रोजी पुढची सुनावणी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड १९ महामारीच्या कारणाने राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या असून विद्यार्थ्यांच्या गुणांचं मूल्यमापन करण्यासाठी शिक्षण मंडळाने अद्याप काहीही सूत्र तयार केलेलं नाही. दहावीच्या परीक्षा रद्द करुन सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय मंडळाने घेतला.

मात्र ११वी प्रवेशप्रक्रीयेत या विद्यार्थ्यांना फटका बसू शकतो तसंच ICSE, CBSE आणि राज्य मंडळाची गुणांकन पद्धत वेगवेगळी आहे. त्यामुळे केंद्रसरकारने याप्रकरणी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी समान धोरण तयार करावं अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे.

त्या सुनावणीदरम्यान शिक्षण मंडळाने ही माहिती दिली. राज्य शिक्षण मंडळ, ICSE, CBSE आणि केंद्रसरकारने यावर जबाब दाखल करावा असा आदेश देऊन न्यायमूर्ती SJ काथावाला आणि न्यायमूर्ती SP तावडे यांच्या खंडपीठाने पुढची सुनावणी उद्या १९ मे रोजी ठेवली आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image