राज्याचा कोरोना मुक्तीदर वाढून ९० टक्क्यांवर

 https://ekachdhyeya.com/wp-content/uploads/2020/12/NPIC-20201214103325.jpg

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्याच्या वर गेलं आहे. नव्यानं आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय घट होऊन सोमवारी ती ३० हजारांच्या खाली आली आहे.सोमवारी राज्यात ४८ हजार २११ रुग्ण बरे होऊन घरी गेले, २६ हजार ६१६  नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ५१६ रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात आतापर्यंत एकूण ५४ लाख ५ हजार ६८ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ४८ लाख ७४ हजार ५८२ रुग्ण बरे झाले, तर एकूण ८२ हजार ४८६ रुग्ण दगावले. राज्यातला कोरोनामुक्तीचा दर आता ९० पूर्णांक १९ शतांश टक्के झाला आहे. तर मृत्युदर १ पूर्णांक ५३ शतांश टक्के आहे.राज्यात आतापर्यंत तपासलेल्या ३ कोटी १३ लाख ३८ हजार ४०७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ पूर्णांक २५ शतांश टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ४५ हजार ४९५  ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image