मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्याच्या वर गेलं आहे. नव्यानं आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय घट होऊन सोमवारी ती ३० हजारांच्या खाली आली आहे.सोमवारी राज्यात ४८ हजार २११ रुग्ण बरे होऊन घरी गेले, २६ हजार ६१६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ५१६ रुग्णांचा मृत्यू झाला.
राज्यात आतापर्यंत एकूण ५४ लाख ५ हजार ६८ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ४८ लाख ७४ हजार ५८२ रुग्ण बरे झाले, तर एकूण ८२ हजार ४८६ रुग्ण दगावले. राज्यातला कोरोनामुक्तीचा दर आता ९० पूर्णांक १९ शतांश टक्के झाला आहे. तर मृत्युदर १ पूर्णांक ५३ शतांश टक्के आहे.राज्यात आतापर्यंत तपासलेल्या ३ कोटी १३ लाख ३८ हजार ४०७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ पूर्णांक २५ शतांश टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ४५ हजार ४९५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.