दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा न घेता त्यांची वर्गोन्नती करावी- राज ठाकरे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा न घेता त्यांची वर्गोन्नती करावी, लॉकडाऊनच्या काळातील विजबिलात सरसकट माफी करावी, तसंच शेतकऱ्यांना हमी भाव देण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वार्ताहर परिषदेत केली.

सध्या सरकारनं छोटे उद्योगधंदे, कारखानदारांना उत्पादन सुरू ठेवण्याची मुभा दिली असली, तरी विक्रीवर बंदी घातली आहे. विक्रीच होणार नसेल तर उत्पादन तरी कसे होईल असा प्रश्न करताना आठवड्यातले दोन ते तीन दिवस विक्रीसाठी दुकाने उघडी ठेवण्याची मुभा द्यावी, अशी सूचना राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे चर्चेदरम्यान केली आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image