किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ दरम्यान सुरू ठेवण्याचा विचार- आरोग्यमंत्री राजेश टोपे
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कठोर निर्बंध असले तरी नागरिक किराणा खरेदीच्या नावाखाली दिवसभर घराबाहेर निघत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ दरम्यान सुरू ठेवण्याचा विचार असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. यासंदर्भात लवकरच शासन निर्णय प्रसिद्ध होणार आहे. त्याचवेळी हवेतून ऑक्सिजन निर्मितीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याचंही ते म्हणाले.
निर्बंधकाळात नागरिकांनामदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या ५ हजार ४७६ कोटींच्या मदत पॅकेजचेलाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत तातडीनं पोचले पाहिजेत. त्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणीकरण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.