विधानसभा निवडणुकांच्या निकाला नंतर सर्व विजय मिरवणुकांवर बंदी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीनंतर किंवा निकाला नंतर सर्व विजय मिरवणुकांवर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. मतमोजणी २ मे रोजी होणार आहे. कोरोंना रुग्ण संख्येत होत असलेल्या मोठ्या वाढीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात पश्चिम बंगालमधील सर्व प्रचारसभा आणि मिरवणूकांवर या आधीच  बंदी घालण्यात आली  आहे. दरम्यान निवडणुकांच्या निकालानंतरच्या मिरवणुका आणि जल्लोषावर निवडणूक आयोगानं घातलेल्या बंदीचं भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी स्वागत केलं आहे.

या निर्णयाचं काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश त्यांनी आपल्या पक्षाच्या, राज्य घटकांना दिले आहेत. कोरोंना संकटाच्या या काळात गरजू लोकांना मदत करण्यासाठी भाजपाचे सर्व कार्यकर्ते आपली शक्ती वापरत आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image