कष्टकरी शेतकऱ्यांच्या आर्थिक हितांचं रक्षण करण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्त्वाची - नरेंद्र मोदी
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक हितांचं रक्षण करण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सातत्यानं महत्वाची भूमिका बजावत आहे, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. नैनीतालच्या खीमानंद यांनी लिहिलेल्या पत्राच्या उत्तरात प्रधानामंत्र्यांनी हे मत व्यक्त केलं आहे. हवामानातल्या अनिश्चिततेची जोखीम पत्करत देशातले कोट्यावधी शेतकरी आज या योजनेचा लाभ घेत आहेत, असंही मोदी म्हणाले. देशाच्या विकासात नागरिकांच्या योगदानाबद्दलही प्रधानमंत्र्यांनी आभार व्यक्त केले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.