देशाच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करण्यासाठी स्थापित राष्ट्रीय समितीची आज पहिली बैठक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करण्यासाठी स्थापित राष्ट्रीय समितीची पहिली बैठक आज होत आहे. या सोहोळ्यासाठी काय तयारी करायची त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत २५९ सदस्यांची ही समिती दूरदृश्य व्यवस्थेद्वारे चर्चा करणार आहे.

या समितीमध्ये केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल तसंच विविध राजकीय पक्षांचे नेते समाविष्ट आहेत.  तसच कलाकार, खेळाडू, व्यवसाय प्रमुख आणि माध्यमकर्मींचा देखील यात समावेश आहे. आझादी का अमृत महोत्सव या स्वरुपात राष्ट्रीय तंसच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करण्याचं सरकारनं ठरवलं आहे.

ही समिती धोरणात्मक मार्गदर्शक सूचना तयार करणार आहे. पुढील वर्षी १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या तारखेपूर्वी ७५ आठवडे आधीपासून म्हणजेच या महिन्याच्या १२ तारखेपासून या उत्सवाची सुरुवात होणार आहे. १२ मार्च हा महात्मा गांधी यांच्या नेतृत्वातील ऐतिहासिक मिठाच्या सत्याग्रहाचा एक्क्याणवाव्वा वर्धापन दिन आहे.

Popular posts
देशांतर्गत मागणीला प्रोत्साहन देण्यासाठी ७३ हजार कोटीची घोषणा
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image