नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना साथीच्या काळात ज्या उमेदवारांनी, केंद्रीय नागरी सेवा आयोगाची परीक्षा दिल्या आहेत, आणि ज्यांच्या प्रयत्नांची संख्या संपली आहे, अशा इच्छुक उमेदवारांना आणखी एक संधी देण्याचं केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं आहे.
मात्र ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी आवश्यक असलेली वयोमार्यादा ओलांडली आहे, अशांना ही सुविधा लागू होणार नाही, असे देखील सरकारनं न्यायालयात स्पष्टं केलं आहे.
कोरोना साथीच्या काळात, परीक्षेची पुरेशी तयारी झाली नसल्याने, परीक्षा पुढं ढकलण्याची मागणी सरकारने अमान्य केली होती, त्यामुळे परीक्षा देणं भाग पडलं. त्यामुळेच, आणखी एक संधी मिळावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
आकडेवारीनुसार, ३ हजार ८६३ उमेदवारांची परीक्षा देण्याची संधी संख्या संपली असून, २ हजार २३६ उमेदवार वयोमार्यादेमुळे बाद झाले आहेत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.