भारत इंग्लंड यांच्यातील वीस षटकांच्या सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंड विरुद्ध आगामी वीस षटकांच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून काल भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. ईशान किशन, सुर्यकुमार यादव, राहुल तवेटीया यांचा नव्याने संघात समावेश करण्यात आला आहे. तर यष्टीरक्षक रिषभ पंत, अष्टपैलू अक्षर पटेल, वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार हे संघात परतले आहेत.

१९ जणांचा भारतीय संघ असा असेल – कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, के. एल राहुल शिखर धवन, श्रेयस ऐय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, ईशान किशन, यझुवेन्द्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तवेटीया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर. ५ सामन्यांची हि मालिका अहमदाबाद इथं १२ मार्च पासून सुरु होईल.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image