नवं शहर वसवण्यापेक्षा मुंबईचा आखीव-रेखीव विकास आव्हानात्मक - उद्धव ठाकरे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई वाढतेय, मात्र वाढत्या मुंबईचं कोणतंही नियोजन नाही. म्हणून आता मुंबईचा आखीव रेखीव विकास करतोय, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत वांद्रे इथल्या कलानगर जंक्शन उड्डाणपुलाच उद्घाटन आणि शिवडी - वरळी उन्नत मार्ग प्रकल्पाचं भूमिपूजन, स्मार्ट वाहनतळ, आणि वांद्रे-कुर्ला संकुलात सायकल ट्रॅक आदी प्रकल्पांचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.

नवं शहर वसवण्यापेक्षा हा विकास आव्हानात्मक असल्याचं ते म्हणाले.  यावेळी सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार राहुल शेवाळे, महापौर किशोरी पेडणेकर, एमएमआरडीएचे आयुक्त आर.ए.राजीव आदी उपस्थित होते.

Popular posts
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊद टोळीतल्या दोघांना अटक
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image