शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी शासनाला तातडीनं प्रस्ताव पाठवण्याची छगन भुजबळ यांची सूचना
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या बेमोसमी पावसानं ३ हजार ३९८ हेक्टर क्षेत्रातल्या शेतपिकांचं नुकसान झालं आहे. एकूण २१७ गावांमधल्या ५ हजार ४६० शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे.
पावसामुळे निफाड, चांदवड, देवळा, कळवण, नाशिक, बागलाण या तालुक्यांमधे पिकांना, विशेषतः कांदा आणि द्राक्ष पिकांना याचा फटका बसला आहे.
बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी शासनाला तातडीनं प्रस्ताव पाठवण्याची सूचना नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.