शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी शासनाला तातडीनं प्रस्ताव पाठवण्याची छगन भुजबळ यांची सूचना

 

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या बेमोसमी पावसानं ३ हजार ३९८ हेक्टर क्षेत्रातल्या शेतपिकांचं नुकसान झालं आहे. एकूण २१७ गावांमधल्या ५ हजार ४६० शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे.

पावसामुळे निफाड, चांदवड, देवळा, कळवण, नाशिक, बागलाण या तालुक्यांमधे पिकांना, विशेषतः कांदा आणि द्राक्ष पिकांना याचा फटका बसला आहे.

बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी शासनाला तातडीनं प्रस्ताव पाठवण्याची सूचना नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image