केंद्र सरकार आणि शेतकरी प्रतिनिधी यांच्यात चर्चेची दहावी फेरी आज नवी दिल्ली इथं होणार
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकरी प्रतिनिधी यांच्यात चर्चेची दहावी फेरी आज नवी दिल्ली इथं होणार आहे. यापूर्वी ही बैठक काल होणार होती पण एका दिवसासाठी तहकूब करण्यात आली होती.
संघटनांना आपापसात अनौपचारिक गट तयार करावा आणि त्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकारला मसुदा सादर करावा. असं कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी शेतकऱ्यांना सांगितलं.दिल्लीत सध्या असलेल्या थंड हवामानबाबत आंदोलन करणार्याग शेतकर्यां ची सरकारला चिंता आहे. चर्चेच्या माध्यमातून लवकरच तोडगा निघेल, याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याचं प्रतिपादन तोमरयांनी केलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.