‘भारताने जगाला प्राणीमात्र, निसर्ग व वसुंधरेच्या अधिकाराचा व्यापक विचार दिला’ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

  ‘भारताने जगाला प्राणीमात्र, निसर्ग व वसुंधरेच्या अधिकाराचा व्यापक विचार दिला’ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई: संयुक्त राष्ट्र संघटनेने दिनांक १० डिसेंबर १९४८ रोजी सकल राष्ट्रीय मानवाधिकार उद्घोषणेचा स्वीकार केला त्यानंतर दरवर्षी १० डिसेंबर हा दिवस मानवाधिकारांप्रती जनजागृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन म्हणून पाळला जातो. मात्र भारतात मानवाधिकाराची फार प्राचीन परंपरा आहे. भारतीय संस्कृतीने केवळ मनुष्यमात्रांच्या अधिकारांचाच नाही तर सकल जीवसृष्टी, प्राणीमात्र, निसर्ग व वसुंधरेच्या अधिकाराचा व्यापक विचार केला असून हा विचार जगाला मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगातर्फे आंतरराष्ट्रीय मानावाधिकार दिनाचे औचित्य साधून एका ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन केले. त्याचे राजभवन येथून दूरस्थ पद्धतीने उद्घाटन करताना राज्यपाल बोलत होते.

मानवाधिकार आयोगासमोर मानवाधिकार उल्लंघनाच्या तक्रारी येत असतात. अशावेळी आयोगाने सर्व बाजूंचा साकल्याने विचार करून न्यायनिवाडा करावा, अशी सूचना राज्यपालांनी केली.

चर्चासत्राच्या उद्घाटनाला राज्य मानवाधिकार आयोगाचे कार्यवाहू अध्यक्ष एम.ए. सईद, अतिरिक्त मुख्य सचिव विजय कुमार गौतम व नितीन करीर, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, टाटा समाजविज्ञान संस्थेच्या विधी विभागाचे अधिष्ठाता अरविंद तिवारी, इंटरनॅशनल जस्टीस मिशनचे उपाध्यक्ष संजय मकवान तसेच व महाराष्ट्र राज्य विधी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप उके प्रामुख्याने उपस्थित होते.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image