पुरग्रस्तांना २ हजार ३०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय


मुंबई (वृत्तसंस्था) : अतिवृष्टी आणि पुरामुळे जून ते ऑक्टोबर या कालावधीत विविध जिल्ह्यात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी  नुकसान भरपाईच्या पहिल्या हप्त्यापोटी जवळपास २ हजार ३०० कोटी  रुपयांचा निधी वितरित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून १० हजार कोटींची नुकसानभरपाई देण्यात येईल, असं जाहीर केलं होते.

त्यानुसार पहिल्या टप्प्यातील मदत लगेच वितरित करण्यात येईल. बहुवार्षिक पिकांचं किमान ३३ टक्के नुकसान झालं आहे, अशा बाधित शेतकऱ्यांना शेतीपिकांच्या जिरायत आणि आश्वासित सिंचनाखालील पिकांच्या नुकसानीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी २५ हजार प्रतिहेक्टर या दरानं २ हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचा निर्णय, राज्य सरकारनं घेतला आहे. 


Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image