भारतीय निवडणूक आयोगाकडून मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय निवडणूक आयोगानं मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. याअंतर्गत मुंबईसाठी येत्या १७ नोव्हेंबर पासून १५ ‍डिसेंबर २०२० पर्यंत हरकती आणि दावे स्वीकारले जाणार आहेत.

१ जानेवारी २०२१ पर्यंत जे वयाची १८ वर्ष पूर्ण करतील, तसंच ज्यांची अजूनही मतदार म्हणून नोंदणी झाली नाही अशांनी आपल्या नावाचा मतदार यादीत समावेश करावा यासाठी अर्ज क्रमांक ६ भरून द्यायचा आहे.

मयत तसंच स्थलांतरीत मतदारांचा शोध घेऊन, त्यांचं नाव मतदार यादीतून कमी करायची कामही या कार्यक्रमाअंतर्गत होणार आहेत. त्यासाठी अर्ज क्रमांक ७ भरून द्यावा लागेल. मतदार यादीत नाव, वय, लिंग या बाबतीत झालेल्या चुकीच्या नोंदींच्या दुरुस्तीसाठी अर्ज क्रमांक ८ भरून द्यावा लागणार आहे.

हे सगळे अर्ज www.nvsp.in या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीनं भरता येतील तसंच अधिक माहितीसाठी १९५० या टोल फ्री क्रमांकाचा वापर करता अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजीव निवतकर यांनी दिली आहे.

 

 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image