भारतीय निवडणूक आयोगाकडून मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय निवडणूक आयोगानं मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. याअंतर्गत मुंबईसाठी येत्या १७ नोव्हेंबर पासून १५ डिसेंबर २०२० पर्यंत हरकती आणि दावे स्वीकारले जाणार आहेत.
१ जानेवारी २०२१ पर्यंत जे वयाची १८ वर्ष पूर्ण करतील, तसंच ज्यांची अजूनही मतदार म्हणून नोंदणी झाली नाही अशांनी आपल्या नावाचा मतदार यादीत समावेश करावा यासाठी अर्ज क्रमांक ६ भरून द्यायचा आहे.
मयत तसंच स्थलांतरीत मतदारांचा शोध घेऊन, त्यांचं नाव मतदार यादीतून कमी करायची कामही या कार्यक्रमाअंतर्गत होणार आहेत. त्यासाठी अर्ज क्रमांक ७ भरून द्यावा लागेल. मतदार यादीत नाव, वय, लिंग या बाबतीत झालेल्या चुकीच्या नोंदींच्या दुरुस्तीसाठी अर्ज क्रमांक ८ भरून द्यावा लागणार आहे.
हे सगळे अर्ज www.nvsp.in या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीनं भरता येतील तसंच अधिक माहितीसाठी १९५० या टोल फ्री क्रमांकाचा वापर करता अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजीव निवतकर यांनी दिली आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.