देशात काल दिवसभरात ४४ हजार ७३९ रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल दिवसभरात ४४ हजार ७३९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. त्यामुळे देशात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ८३ लाख ३५ हजार १०९ झाली आहे. याबरोबच देशातला कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर वाढून ९३ पूर्णांक ५२ शतांश टक्क्यावर पोचला आहे.

देशात काल ३८ हजार ६१७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांचीही नोंद झाली. यामुळे देशभरातल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८९ लाखापेक्षा जास्त झाली आहे. काल देशभरात ४७४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

त्यामुळे कोरोनाबळींची एकूण संख्या, १ लाख ३० हजार ९९३ झाली आहे. देशातला कोरोना मृत्यूदर सध्या १ पूर्णांक ४७ शतांश टक्के इतका आहे. सध्या देशभरात, ४ लाख ५३ हजार ४०१ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.

 

 

Popular posts
कोल्हापुरातल्या गावित भगिनींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊद टोळीतल्या दोघांना अटक
Image