देशासाठी प्राण देणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली


मुंबई (वृत्तसंस्था) : देशासाठी धारातीर्थी पडलेल्या पोलिसांना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नायगाव पोलीस मुख्यालयात श्रद्धांजली वाहण्यात आली. यानिमित्तानं पोलिस संचलनही झालं. मुख्यमंत्री ठाकरे यांनी सुरूवातीला हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केलं.

कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झालेल्या २६ पोलिस अधिकारी आणि २४० पोलिस अमलदारांना मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली. तसंच त्यांच्या पवित्र स्मृतिंना विनम्र अभिवादन केलं. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, गृह राज्यमंत्री सतेज पाटील आणि शंभुराजे देसाई उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हौतात्म्य पत्करलेल्या पोलिसांना श्रद्धांजली वाहिली. अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे की, सीमेवर शत्रुशी लढताना तसंच दहशतवाद आणि नक्षलवादाचा बिमोड करताना पोलिसांनी हौतात्म्य पत्करलं आहे.

आठ महिने पोलिस कोरोनासारख्या अदृष्य शत्रुशी लढत आहेत. त्यांच्या देशभक्ति आणि कर्तव्यनिष्ठेचा आम्हाला अभिमान आहे. भारतीय पोलिस जगात सर्वोत्कृष्ट असल्याचंही त्यांनी संदेशात म्हटलं आहे.


Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
देशांतर्गत मागणीला प्रोत्साहन देण्यासाठी ७३ हजार कोटीची घोषणा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
एम. व्ही. मंगलम या कार्गो जहाजावरच्या १६ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश
Image