स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
• महेश आनंदा लोंढे
मुंबई : हैदराबाद मुक्ती संग्रामाचे प्रणेते, महाराष्ट्र राज्य निर्मितीचे शिल्पकार स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्याचे, त्यागाचे स्मरण करुन त्यांना अभिवादन केले आहे.
स्वामीजींनी हैदराबाद संस्थानातल्या मराठी, तेलुगू, कन्नड अशा भिन्न भाषिकांना एकत्र आणून हैदराबाद मुक्तीचा लढा लढला. हैदराबाद संस्थानाचं भारतातलं विलिनीकरण, मराठवाडा मुक्ती संग्रामातलं यश, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती या ऐतिहासिक घटनांमागे स्वामीजींची दूरदृष्टी, प्रेरणा, त्याग आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वामीजींना आदरांजली वाहिली.
स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या जडणघडणीत स्वामीजींचं मोठं योगदान आहे. राजकारण, समाजकारणाच्या बरोबरीनं त्यांनी देशात शैक्षणिक चळवळ राबवली. अखंड भारताचे निर्माते, मराठवाड्याचे मुक्तीदाते म्हणून ते कायम स्मरणात राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.