लॉकडाऊन दरम्यान बाल विवाह प्रकरणांमध्ये वाढ


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) कडून मिळालेल्या माहितीनुसार लॉकडाऊन कालावधीत बालविवाहाच्या वाढलेल्या संख्येचा कोणताही डेटा उपलब्ध नाही.


सरकारने ‘बालविवाह प्रतिबंध कायदा (पीसीएमए), 2006’ लागू केला आहे. बालविवाहाचे दुष्परिणाम अधोरेखित करण्यासाठी सरकार जागरूकता अभियान, माध्यम अभियान आणि प्रचार कार्यक्रम राबवते आणि वेळोवेळी राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना सल्ला देतात. महिला व बाल विकास मंत्रालय ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ (बीबीबीपी) या योजनेची अंमलबजावणी करते आहे, ज्यात लैंगिक समानतेशी संबंधित बाबींविषयी महिलांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि बालविवाह रोखणे यावर भर दिला जात आहे. बाल हक्क संरक्षण राष्ट्रीय आयोग (एनसीपीसीआर) देखील या संदर्भात वेळोवेळी जागरूकता कार्यक्रम आणि संबंधितांशी सल्लामसलत करीत आहे.


केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती झुबिन इराणी आज राज्यसभेत यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली.


Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image